मुख्य सामग्रीवर वगळा

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आणि कोणत्या स्पर्धा असतात 2023

         स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? - 2023

                स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात  दिली जाते.  या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या  सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!






     आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी  पोलीस भरती केली जाते त्या पदासाठी उमेदवार  शारीरिक स्वरूपात देखील परिपूर्ण असायला हवा मग अशा पदांसाठी लेखी परीक्षे सोबतच शारीरिक गुणवत्ता चाचणी सुद्धा घेतली जाते!
शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरती साठी त्या त्या विभागात अशा स्वरूपांच्या स्पर्धा परीक्षा होत असतातच,
त्यापैकी काही मुख्य स्पर्धा परीक्षा  :-

  1. युपीएससी
  2. एमपीएससी
  3. स्टाफ सिलेक्शन 
  4. बँकिंग
  5.  रेल्वे
  6.  पोस्ट
  7. संरक्षण दल
  8.  एलआयसी, इत्यादी. 
               तशा इतर बऱ्याच स्पर्धा परीक्षा असल्या तरी त्या प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो मात्र केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी युपीएससी ही परीक्षा सर्वात महत्त्वाची असते. कारण कमी जास्त प्रमाणात हाच अभ्यासक्रम सर्वात परिपूर्ण सर्वात अवघड म्हणण्यापेक्षा सर्वसमावेशक असा असतो.

🔴 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात, त्या सर्व परीक्षा खालील प्रमाणे आहेत :-

१.राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
२.पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
३.विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
४.कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
५.सहायक परीक्षा (Assistant Examination)
६.लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)
७.महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
८. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
९.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
१०.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
११.दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
१२.सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत १३.अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng.

स्पर्धा परीक्षेची तयारी? 

विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि वेगवेगळ्या शासकीय सेवांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आली आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत. बी.ए.बी.कॉम, बी.एस्सी. यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमास सुरुवात केली तर पदवी होईपर्यंत विद्यार्थ्यांचा जवळपास 50 टक्के स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला असेल व असे विद्यार्थी पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होतात. जे विद्यार्थी कमी वयात अधिकारी होतील ते सहजपणे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतात.


नेमकी तयारी कशी करावी

दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत जर एम.पी.एस.सी. किंवा यु.पी.एस.सी.साठी घेण्यात येणाऱ्या फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतला तर त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. यानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात. यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी ही परीक्षा नेमकी काय असते, यावर ‘आयएएस प्लॅनर’ व एमपीएससीसाठी ‘एमपीएससी प्लॅनर’ ही दोन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती वाचून काढावी. यामुळे या परीक्षासंदर्भातील आपल्या सर्व शंका दूर होतील.

स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन (जनरल नॉलेज) या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत विचारले जातात. त्यामुळे सामान्य अध्ययन या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान वाचून त्याच्या नोंदी कराव्यात. लोकराज्य, योजना, यशदा-यशमंथन, कुरुक्षेत्र ही मासिके नित्यनियमाने वाचायला हवीत. वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणत: वर्तमानपत्राचा या परीक्षांसाठी 20 ते 25 टक्के वाटा आहे म्हणून लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे. दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणीवरील मराठी व इंग्रजी बातम्याही दररोज ऐकायला हव्यात.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Registration form class 11th and 12th study for exam

HTML CSS JS Result Skip Results Iframe How many letters are there in "JS"? 2 1 3 4 How many letters are there in "BMX"? 2 1 3 4 How many letters are there in "A"? 2 1 3 4 View Results My results will appear here

10 वी नंतर कोणतं करिअर निवडायचं

मित्रांनो सध्याचा हा युग स्पर्धा परीक्षांचा आहे यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी आपण आपल्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त जोर द्यावे कारण पुढे शिकाल तरच तुम्ही टीकाल     आता थोडं आपण आपल्या मुद्द्यावर येऊ खरंतर आपल्याला प्रश्न पडतो दहावीनंतर कोणता विषय किंवा कोणते सब्जेक्ट आपण निवडायला हवे सायन्स निवडायचं की कॉमर्स निवडायचं की आर्ट्स निवडायचं याच्यात आपण गुंतलेलो असतो खरंतर प्रत्येक जण सायन्स घेईल आर्ट गेली कॉमर्स घेईल असं नाही तर आपण आपल्यात असलेले गुण समजून घेतले पाहिजे व आपल्यात असलेल्या सर्व प्रकारच्या ज्या आपल्याला येत असलेल्या गोष्टी असतील ज्याच्यात पुढे आपल्याला जास्तीत जास्त प्रकारची माहिती वाढवता येऊ शकते किंवा आपण आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो तीच फिल्ड आपण निवडायला हवी आपण इतरांच्या बरोबर त्याने जीफिल्ड निवडली त्याच फिल्डमध्ये मी ही प्रवेश घेईल असे करायचे नाही कारण तो त्याच्या फिल्डमध्ये बरोबर असतो आपल्याला जर त्या फील चे नॉलेज नसले तर आपण अपयशी ठरतो व आपला मार्ग चुकतो यासाठी आज मी तुम्हाला काही मोटिवेशन व आपला मार्ग कसा न...